Eknath Shinde :  उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत, शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला

Eknath Shinde : उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत, शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला

| Updated on: Oct 11, 2025 | 3:03 PM

एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिली. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी संकटात सापडलेल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. महायुती सरकारने ३१,००० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांच्या मागे केंद्र सरकार उभे राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकारने या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मोठे पॅकेज जाहीर केले असून, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

महायुती सरकारने ३१,००० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमध्ये पीक नुकसान, जमीन धूप, पशुधन हानी, जीवितहानी आणि घरांचे नुकसान या सर्वांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत, सरकारने ठोस मदत केल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधत उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत असं म्हणत खोचक टोलाही लगावला.

Published on: Oct 11, 2025 03:03 PM