मुंबई : मेट्रो 2 ए आणि 7 ची ट्रायल रन सुरू आहे. कोविडमध्ये वर्क फोर्स नसताना काम वेळेत केलं. वेस्टर्न एक्सस्प्रेस हायवे महत्वाचा आहे. एअरपोर्टवरून बाहेर आल्यावर गोंधळ, ट्राफिक असते. हा मार्ग म्हणजे दुसरा गेटवे ऑफ इंडिया आहे. वॉकिंग सिटी, सायकलिंग सिटी यात दहिसर ते माहीम सायकलिंग आणि चालत येऊ शकलो पाहिजे. फुटपाथ, सायकलिंग करता आले पाहिजे, यासाठी नंदादीप गार्डन वाढवत आहोत. कामाचा वेग ही महाराष्ट्राची सुवर्णसंधी. मुंबई महाराष्ट्राला नवा काळ आणून दाखवू, असे वक्तव्य पर्यापरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मेट्रो उद्घाटन प्रसंगी केले.