बहुमजली इमारतींमध्ये फायर फायटिंग सिस्टीम नसल्यास बीएमसी कारवाई करणार. निष्काळजी सोसायट्यांवर कारवाई करा. अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसलेल्या इमारतींवर कारवाई होणार. मुंबईत गगनचुंबी इमारतीचे जाळे पसरले आहे. हे शहर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र, सध्या हेच शहर अपघाताचे शहर बनले आहे. कारण दहा वर्षात मुंबईत तब्बल 48,434 आगीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस मुंबई अग्निशमन दलांनी ही माहिती दिली आहे.