गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी, मंडल आणि आरक्षण या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही. कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता. वंचितांच्या आरक्षणाला नाकं मुरडली होती. त्यावेळी शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला?, असा सवाल पडळकर यांनी आव्हाड यांना केला.