Gopinath Munde legacy : गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारस वादात आता तिसऱ्या मुंडेंची एन्ट्री!

Gopinath Munde legacy : गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारस वादात आता तिसऱ्या मुंडेंची एन्ट्री!

| Updated on: Oct 24, 2025 | 9:47 PM

गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसा वादात धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यानंतर आता प्रकाश शेंडगेंनी टीपी मुंडेंचं नाव पुढे आणलं आहे. भुजबळांच्या विधानानंतर सुरू झालेल्या या वादात टीपी मुंडेंनी ओबीसींसाठी केलेलं काम अधोरेखित करण्यात आलं. दरम्यान, जरांगे पाटलांनी या राजकीय घडामोडींवरून सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसाचा वाद अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. सुरुवातीला भुजबळांनी धनंजय मुंडेंनी हा वारसा चालवावा असे विधान केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून माजी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार असल्याचे म्हटले. आता या वादात प्रकाश शेंडगेंनी तिसऱ्या एका मुंडेंची, अर्थात टीपी मुंडेंची, एन्ट्री घडवून आणली आहे.

शेंडगेंनी दावा केला आहे की टीपी मुंडे हेच दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा चालवत आहेत. टीपी मुंडे आरक्षण वादातील त्यांच्या “आमच्या हाती कोयते आहेत” या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. शेंडगेंनी म्हटले की, जो कोणी मुंडे साहेबांच्या विचारांचा वारसा चालवेल, तोच खरा वारसदार. त्यांनी टीपी मुंडेंना ओबीसी समाजाच्या मदतीला धावून येणारा आणि मुंडे साहेबांचा विचारांचा वारसा पुढे नेणारा नेता म्हणून संबोधले. यावर अद्याप धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Published on: Oct 24, 2025 09:47 PM