Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. सततच्या पावसामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. सततच्या पावसामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावरील वाढलेली वाहतूक आणि पावसामुळे निर्माण झालेल्या संथ गतीचा परिणाम संपूर्ण मार्गावरील वाहतुकीवर झाला आहे.
वाहतूक कोंडीमुळे मालवाहतूक, खासगी वाहने तसेच प्रवासी वाहनांचा वेग मंदावला असून अनेक वाहनचालक महामार्गावर अडकून पडले आहेत. पावसामुळे रस्त्यांवरील परिस्थिती अधिक गंभीर बनली असून वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी कार्यरत असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांनी अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
