वसई, 28 जुलै 2023 | वसई, पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. गुरुवारी दुपारपासून रात्रभर पडलेल्या पावसाने शहरातील मुख्य रस्त्यावर दोन फूट पाणी साचलेले आहे. तर वसई पश्चिम गोकुळ अंगण परिसर हा पूर्णपणे पाण्याखाली गेला, या परिसरातील 9 इमारती गुडघाभर पाण्याखाली आहे. त्यामुळे 200 कुटुंबाची मागच्या 15 दिवसापासून वाताहत सुरू आहे. इमारतीचा तळ मजल्यात पाणी शिरले असून, आजूबाजूचा सोसायटी परिसर हा जलमय झाला आहे. या सोसायटी मधील रहिवाशी हे वरच्या मजल्यावरील एकमेकांना आधार देऊन राहत आहेत. इमारतीमध्ये हळू हळू पाणी भरू लागल्याने अनेकांच्या घरात जेष्ठ नागरिक महिला आहेत, लहान मूल आहेत, ते सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन या इमारतीत राहत आहेत.