गेल्या दीड तासापासून एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेबाबत खलबतं सुरू आहेत. बंडखोर आमदारांना मुंबईत कसं आणायचं याबाबत चर्चा सुरू आहे. शिंदे गटात मुंबईत आल्यानंतर त्यांना केंद्राकडून सुरक्षा दिली जाणार आहे. मुंबईत जाताना घाबरू नका, असं आवाहन एकनाथ शिंदेंनी या बैठकीत आमदारांना केलं. कायदेशीर बाबींबद्दलही या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. राज्यात होणाऱ्या विरोधाला कसं सामोरं जायचं, याबाबतही चर्चा झाली.