अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता – जयंत पाटील

अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता – जयंत पाटील

| Updated on: Feb 15, 2026 | 12:11 PM

जयंत पाटील यांनी उघड केले की, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासाठी आग्रह होता. त्यांच्या निधनानंतर या विषयावर बोलणे योग्य नाही, असे पाटील म्हणाले. विलीनीकरण कुणाला नको होते, याचा निष्कर्ष जनतेने व आमदारांनी काढावा, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात जयंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, दिवंगत नेते अजित पवार यांचा विलीनीकरणासाठी सातत्याने आग्रह होता. अलीकडच्या सात-आठ महिन्यांत अजित पवार अनेक वेळा त्यांच्या निवासस्थानी आले होते आणि त्यांनी विलीनीकरणाचा विषय मांडला होता.

सुनील तटकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, ज्या व्यक्तीसोबत चर्चा झाली, ती आता हयात नसल्यामुळे या विषयावर अधिक बोलणे त्यांना आवश्यक वाटत नाही. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर विलीनीकरणाच्या निर्णयावर शंका-कुशंका घेणे योग्य नसल्याचे त्यांचे मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व आजही कायम असून, पक्ष व्यवस्थित चालू आहे. विलीनीकरण कोणाला नको होते, याचा निष्कर्ष महाराष्ट्रातील जनतेने आणि दोन्ही बाजूच्या आमदारांनी काढावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Published on: Feb 15, 2026 12:11 PM