
“सध्याचं राजकारण पाहता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जुळवून घ्यावं”, कोणी केली मागणी?
उद्धव ठाकरे काल यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यापूर्वी महंत कबीरदास महाराज यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली.
वाशीम : उद्धव ठाकरे काल यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यापूर्वी महंत कबीरदास महाराज यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, “3 डिसेंबर 2018 ला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे इथे आले होते. यावेळी प्रचंड असा जनसागर पाहायला मिळाला. ठाकरे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून संजय राठोड यांनी बंजारा समाजाच्या विकासासाठी काम केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची धुरा सांभाळावी. सध्या जनता राजकारणाला कंटाळली आहे. कोणीतरी दोन पाऊले मागे यावे, अशी माझी इच्छा आहे.”
Published on: Jul 10, 2023 10:16 AM
Related Video
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरची आत्महत्या; राजकीय धमकी अन्...
SIRच्या यादीतून मुंबईतील 36 लाख नावे वगळली; नेत्याच्या दाव्याने खळबळ
5 महिन्यात बादशाहचा दुसरा संसार मोडला, पोटगी म्हणून किती रुपये दिले?
जरांगे यांची प्रकृती खालावली, सरकार दरबारी मोठ्या हालचाली, मोठी अपडेट?
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार