सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. मात्र, त्यांनी योग्य असतील तरच मागण्या कराव्यात. कारण राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे. मागण्या मान्य करणाऱ्यांनीही मागण्यांमागची भावना समजून घ्यावी. मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका, असा सल्ला अवघ्या एका वाक्यात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला. ते नाशिकमध्ये बोलत होते. पवार म्हणाले, शिक्षण खात्याचा अति हस्तक्षेप नको, अशा काही शिक्षण संस्था चालकांच्या तक्रारी आहेत. सरकारी हस्तक्षेपाला मर्यादा हव्या, पण संस्था चालकांनीही तारतम्य ठेवणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. मागच्या सरकारनं त्यांच्या कार्यकाळात भरती होऊ दिली नाही. मागच्या सरकारनं संस्था चालकांकडे चमत्कारिक नजरेनं पाहिलं. मागच्या सरकारनं अनेक गोष्टी तशाच ठेवल्या.