स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार माफी मागितली होती, असं वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं होतं. त्यावरुन राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानकारक उद्गार काढणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यानंतर आज नाशिकमधून बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याचं आवाहन केलंय.