राम मंदिर घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी अहवाल मागवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांसह जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अहवाल मागवला असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच या घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवतांनी हस्तक्षेप करावा असं शिवसेनेने सामनातून म्हटलं आहे.