मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या काहीशा प्रमाणात कमी होत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला थोपवण्यासाठी राज्यात 1 मे पासून लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. मात्र, लसींचा साठा नसल्यामुळे ही लसीकरणाची मोहीम 1 मे रोजी सुरु होऊ शकणार नाही. तसेच सध्या सुरु असलेल्या 45 वर्षापेक्षा जास्त नागरिकांच्या लसीकरणासाठीसुद्धा पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाहीये. या पार्श्वभूमीवर राज्यात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट…