नाकाने कांदे सोलतात मग…; अंबादास दानवेंनी अजित पवारांना घेरले

नाकाने कांदे सोलतात मग…; अंबादास दानवेंनी अजित पवारांना घेरले

राखी राजपूत | Updated on: Nov 16, 2025 | 3:20 PM

पार्थ पवार प्रकरणात अजित पवारांनी चौकशीला सामोरे गेलेच पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. अजित पवार नाकाने कांदे सोलतात, मग त्यांनी अशा चौकशीला सामोरे जावे, असे दानवे म्हणाले. जयंत पाटील यांनी सांगलीच्या राजकारणावर भाष्य केले तर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर निशाणा साधला.

महाराष्ट्राच्या राजकारणात विविध मुद्द्यांवरून नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. जतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. सांगलीबाबत विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासोबत तीन वेळा बैठक झाली असून, निवडणुका कशा लढवायच्या यावर चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी चिन्हावर लढला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, पार्थ पवार प्रकरणात अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. “अजित पवारांनी अशा चौकशीला सामोरे गेलेच पाहिजे. त्यांनी अग्निपरीक्षा दिलीच पाहिजे,” असे दानवे म्हणाले. अजित पवार नाकाने कांदे सोलतात, मग त्यांनी चौकशीला सामोरे जावे, असेही दानवे यांनी म्हटले. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर टीका केली. छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात गावांमध्ये माणसेच नव्हती, ज्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास नसल्याचे दिसून येते. महानगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांचा बुरखा फाडून त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

Published on: Nov 16, 2025 3:20 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us