ठाकरे बंधूंच्या युतीत ‘मिठाचा खडा’वरुन देशपांडेंवर निशाणा!

ठाकरे बंधूंच्या युतीत ‘मिठाचा खडा’वरुन देशपांडेंवर निशाणा!

| Updated on: Feb 15, 2026 | 10:15 AM

महापालिका निवडणुकांनंतर ठाकरे गटाच्या शिवसेना आणि मनसेमध्ये शाब्दिक खटके उडत आहेत. संजय राऊत यांनी संदीप देशपांडेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, ठाकरे बंधूंच्या युतीत कुणीही मिठाचा खडा टाकू शकत नाही असे म्हटले. चंद्रपूरमधील भाजपसोबतच्या आघाडीवरून आणि नगरसेवकांना एक कोटी मिळाल्याच्या आरोपावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार टीका-टिप्पणी सुरू आहे.

महापालिका निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेने भाजपसोबत युती करत महापौरपद मिळवले. यावर संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाच्या नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये मिळाल्याचा गंभीर आरोप केला.

या आरोपांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी संदीप देशपांडे यांच्यावर निशाणा साधला. “कुणाची कितीही इच्छा असली तरी ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडणार नाही,” असे राऊत यांनी म्हटले. त्यांनी देशपांडेंना “तुम्ही पैसे मोजायला बसले होतात का?” असा प्रतिप्रश्नही केला. कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर राऊतांनी मनसेवर टीका केली होती, आता चंद्रपूर प्रकरणावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांमधील ही राजकीय लढाई आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Published on: Feb 15, 2026 10:15 AM