शिंदे सेनेकडून भरलेले अर्ज मागे घेत 2 महिला उमेदवारांचा भाजपात प्रवेश

शिंदे सेनेकडून भरलेले अर्ज मागे घेत 2 महिला उमेदवारांचा भाजपात प्रवेश

राखी राजपूत | Updated on: Nov 20, 2025 | 5:31 PM

महाराष्ट्रातील महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असतानाच केंद्रीय नेतृत्वाने पक्ष बांधणीच्या सूचना केल्या आहेत. जळगावमध्ये शिंदे सेनेतून भाजपमध्ये प्रवेश, तर हिंगोलीत भाजपकडून शिवसेनेत प्रवेश असे प्रकार समोर आले आहेत. उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाण यांचे कौतुक केले, तर निलेश राणे यांनी युतीबाबत भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्रातील महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोड्या सुरू असतानाही केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी असल्याचे सूत्रांकडून कळते. आरोप-प्रत्यारोप होत राहतील, पण पक्ष बांधणीचे काम सुरू ठेवावे, अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने केल्या आहेत. स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे सेनेमध्ये वाद दिसून येत आहेत. जामनेरमध्ये शिंदे सेनेच्या दोन महिला उमेदवारांनी अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केला. याउलट, हिंगोलीमध्ये भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. उदय सामंत यांनी रत्नागिरीमधून प्रचार सुरू केल्याबद्दल रवींद्र चव्हाण यांचे कौतुक केले असून, त्यांना पदाने मोठे म्हटले आहे. निलेश राणे यांनी महायुतीसाठी प्रयत्न केले, परंतु युती यशस्वी झाली नाही असे सांगितले. ज्यांना युती करायची होती, त्यांच्यासोबत युती झाली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Published on: Nov 20, 2025 5:31 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us