सरकारने आश्वासन पाळलं नाही तर… मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून खळबळजनक विधान
मराठा आदोलक मोनज जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच इतर नेत्यांशी उशीरा रात्री पर्यंत चर्चा केली यांनतर त्यांनी रात्र 1 वाजताच्या सुमारात त्यांचं आमरण उपोषम मागे घेतलं, उपोषणादरम्यान तीव्र उष्णता आणि रखरखत्या उन्हामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मराठा आदोलक मोनज जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच इतर नेत्यांशी उशीरा रात्री पर्यंत चर्चा केली यांनतर त्यांनी रात्र 1 वाजताच्या सुमारास त्यांचं आमरण उपोषम मागे घेतलं, उपोषणादरम्यान तीव्र उष्णता आणि रखरखत्या उन्हामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील 48 तास विशेष निगराणीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
यादरम्यान त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली.मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण तूर्तास मागे घेतले आहे. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना घाई करू नये. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेचाही त्यांनी उल्लेख केला. घाईगडबडीत शासकीय निर्णय काढल्यास त्यावर पुन्हा आक्षेप निर्माण होऊ शकतात, असे त्यांना सांगण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी मागितला आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनीही सरकारला वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात सरकार कोणती भूमिका घेते आणि आरक्षणाबाबत काय निर्णय घेते, याकडे राज्यभरातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
