नवी दिल्ली : बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीत बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, पोखरियाल यांच्यासह राज्याचे शिक्षणमंत्रीही बैठकीला उपस्थित राहणार आहेत.