यवतमाळ : शहरात गेल्या 5 वर्षांपासून अमृत योजनेचे काम सुरू आहे. यासाठी शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाईपलाईनचे खड्डे करण्यात आले आहेत. हे खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असून या खड्यात पडून काही दिवसापूर्वी एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर मनसे आक्रमक झाली असून मनसे कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन केले आहे. मनसेने 20 फूट खड्ड्यात उतरून आंदोलन केले. मनसेचे जिल्हादयक्ष अनिल हमदापुरे देवा शिवरामवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले