Ahilyanagar :  मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?

Ahilyanagar : मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?

| Updated on: Jan 01, 2026 | 5:47 PM

अहिल्यानगर पालिका निवडणुकीतील मनसेचे दोन उमेदवार गेल्या 24 तासांपासून बेपत्ता झाले आहेत, त्यांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला जात आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हा प्रकार घडल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्षांनी केला आहे. दुसरीकडे, धुळे महानगरपालिकेत भाजपच्या सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अहिल्यानगरमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, जिथे पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार गायब झाल्याची चर्चा आहे. गेल्या 24 तासांपासून या उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क झालेला नाही. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी उमेदवारांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मनसेने म्हटले आहे की, गेले दोन-तीन दिवसांपासून त्यांच्या उमेदवारांना दमदाटी केली जात आहे आणि निवडणूक न लढवण्याचे संदेश दिले जात आहेत. मनसेने निवडणूक निरीक्षक आणि पोलिसांना लवकरात लवकर तपास करण्याचे आवाहन केले आहे, तसेच या घटनेला लोकशाही दाबण्याचे काम असे म्हटले आहे.

 

 

Published on: Jan 01, 2026 05:47 PM