Nawab Malik Controversy:  नवाब मलिक यांच्यामुळे राष्ट्रवादी महायुतीच्या चर्चेतून दूर? मुंबईतील NCP नेतृत्व अन् नियुक्तीला BJP चा विरोध

Nawab Malik Controversy: नवाब मलिक यांच्यामुळे राष्ट्रवादी महायुतीच्या चर्चेतून दूर? मुंबईतील NCP नेतृत्व अन् नियुक्तीला BJP चा विरोध

Harshada Shinkar | Updated on: Dec 12, 2025 | 2:28 PM

नवाब मलिक यांच्या नेतृत्वावरून राष्ट्रवादी आणि महायुतीतील चर्चेत अडथळा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. भाजपने मलिकांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. यावर भास्कर जाधव यांनी, "सत्ताधारी लोक जनतेला वेडे समजतात, वेडे बनवतात" अशी टीका केली. पटोलेंनी भाजपवर दुहेरी भूमिकेचा आरोप केला.

नवाब मलिक यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी चर्चा सुरू आहे. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व नवाब मलिक करणार असल्यामुळे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता कमी झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) नवाब मलिक यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला आहे, तर अन्य कुणाला जबाबदारी दिल्यास विरोध नसेल असे म्हटले जात आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर “जनतेला वेडे समजतात, वेडे बनवतात” असा आरोप केला आहे. नवाब मलिकांचा सीट नंबर सत्ताधारी पक्षाच्या बाजूला असल्याचा संदर्भ देत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तसेच, काँग्रेस नेते पटोले यांनी “नागपूरचा प्यारेखान आवडतो, पण मुंबईचा नवाब मलिक नाही” असे म्हणत भाजपच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. प्रवीण दरेकर यांनी महायुती एकत्र लढणार असल्याचे सांगितले असले तरी, नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत जाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Published on: Dec 12, 2025 2:28 PM
Follow Us