नवाब मलिक यांनी नुकताच राज्यपाल आणि भाजपावर टिका केली आहे. मलिक म्हणाले की, भाजपच्या सर्व तक्रारी राज्यपालांकडे जात आहेत. राजभवन हे राजकीय आखाडा झाले आहे. मलिक इतक्यावरच थांबले नाहीत तर ते पुढे म्हणाले की, भाजप थेट लोकायुक्तांकडे तक्रार का करत नाही?. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh Kyoshari)आणि राज्य सरकार यांच्यातला वाद संपण्याचं नाव घेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना पत्र लिहिले होते. मात्र हे पत्र अपमानजनक असल्याचं राज्यपाल म्हणाले होते.