भाजपने लोकशाहीचा गळा घोटू नये

| Updated on: Aug 16, 2022 | 7:33 PM

भारत ज्यावेळी स्वातंत्र्य झाला त्यावेळी ज्या स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे, त्यांनी मोठ्य कष्टानी आणि रक्त सांडून त्यांनी स्वातंत्र्य बहाल केले आहे, त्यामुळे त्या स्वातंत्र्याचा भाजपवाल्यानी गळा घोटू नये अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Follow us on

राज्यात पुन्हा भाजप सक्रीय होत असून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणायचं असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकादा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप नोंदवत आता राज्यातील नागरिकांनी काय बोलायचं  आणि काय बोलायचं नाही हे पण तुम्हीत ठरवणार का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थिती केला आहे. भारत ज्यावेळी स्वातंत्र्य झाला त्यावेळी ज्या स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे, त्यांनी मोठ्य कष्टानी आणि रक्त सांडून त्यांनी स्वातंत्र्य बहाल केले आहे, त्यामुळे त्या स्वातंत्र्याचा भाजपवाल्यानी गळा घोटू नये अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.