एकच खळबळ! ‘पेपर फुटल्याचं आम्हाला मान्यच नाही, कारण…’ NEET पेपरफुटी प्रकरणी NTA अध्यक्षांचं सर्वात मोठं विधान
नीट (NEET) पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे प्रचंड मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान झाले आहे. परीक्षेतील अनियमिततेमुळे परीक्षा रद्द होण्याची नामुष्की ओढवली, ज्यामुळे २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
नीट (NEET) पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे प्रचंड मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान झाले आहे. परीक्षेतील अनियमिततेमुळे परीक्षा रद्द होण्याची नामुष्की ओढवली, ज्यामुळे २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पेपर सेट करणार्या (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) म्हणजेच NTA ने पेपरफुटीबाबत मोठं विधान केलं आहे.
समितीने पेपरफुटीबाबत विचारताच, अध्यक्षांनी थेट उत्तर दिलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) नेहमीच सावध पवित्रा घेते. NTA ने नुकतंच संसदीय समितीला स्पष्ट केलं की, देशभरात कोणताही ‘पेपर लीक’ झालेला नाही. त्यांच्या मते, फक्त परीक्षेपूर्वी “काही प्रश्न बाहेर आले होते”. CBI जेव्हा या प्रकरणाला पेपरफुटी सिद्ध करेल, तेव्हा आम्ही नीट पेपर खरंच लीक झाल्याचं मान्य करू. आताच आम्ही पेपर फुटल्याचं मान्य करू शकत नाही.