Praful Patel | सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का? प्रफुल्ल पटेल यांनी त्या टीकेला दिले उत्तर; म्हणाले…
पतीच्या निधनाला दहादिवसही झालेले नसताना शपथविधीची इतकी घाई कशाला? तेराव्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेता आली असती? मंत्रीपद कुठे पळून जात होतं का? अशा प्रकारच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त झाल्या. सुनेत्रा पवार यांना लक्ष्य करण्यात आलं. त्यावर प्रफुल्ल पटेल आज बोलले आहेत. “पवार कुटुंबात तीन दिवसांचा शोक असतो.
पतीच्या निधनाला दहादिवसही झालेले नसताना शपथविधीची इतकी घाई कशाला? तेराव्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेता आली असती? मंत्रीपद कुठे पळून जात होतं का? अशा प्रकारच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त झाल्या. सुनेत्रा पवार यांना लक्ष्य करण्यात आलं. त्यावर प्रफुल्ल पटेल आज बोलले आहेत. “पवार कुटुंबात तीन दिवसांचा शोक असतो. पवार कुटुंबात तीन दिवसांचा शोक असतो असं सुनेत्रा पवारांनीही सांगितलं” असं प्रफुल्ल पटेल बाजू सावरत म्हणाले.
गेल्या आठवड्यात अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. विमान कोसळल्याने पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 28 जानेवारीला अजित पवार यांचे निधन झाले, आणि फक्त तीन दिवसांनी, 31 जानेवारीला, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घाईमुळे सोशल मीडियावर टीकाटिप्पणी सुरु झाली आणि सुनेत्रा पवार यांना लक्ष्य केले गेले.
