Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यानंतर अखेर नवी मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील विविध भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यानंतर अखेर नवी मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील विविध भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
जुईनगर, बेलापूर, सानपाडा, पनवेल तसेच परिसरातील अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. सकाळपासूनच नवी मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून, काळ्या ढगांनी आकाश व्यापले आहे.
उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असून वातावरण अधिक आल्हाददायक झाले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने नवी मुंबई आणि परिसरासाठी पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, स्थानिक प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
पावसाच्या आगमनामुळे शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
