सत्ता आमच्यासाठी नकोय, पण…; राज ठाकरे स्पष्टच बोलले

सत्ता आमच्यासाठी नकोय, पण…; राज ठाकरे स्पष्टच बोलले

| Updated on: Jan 08, 2026 | 10:14 AM

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील वाढत्या ड्रग्स समस्येवर आणि राजकारणाच्या विद्रुपीकरणावर चिंता व्यक्त केली आहे. राजकारणातील वाढलेल्या पैशांचा संबंध ड्रग्सशी जोडत, त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सत्ता आमच्यासाठी नकोय असे सांगत, राज ठाकरेंनी सध्याच्या राजकारण्यांच्या सत्तांध वृत्तीवर सडकून टीका केली.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि सामाजिक समस्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून ड्रग्सविरोधातील धाडी थांबल्या असून, आता शाळांपर्यंत ड्रग्स पोहोचले असल्याचे त्यांनी म्हटले. राजकारणामध्ये वाढलेल्या पैशांचा आणि रस्त्यावर आलेल्या ड्रग्सचा संबंध जोडत त्यांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना, मुख्यमंत्र्यांकडून सरसकट क्लीन चीट दिल्या जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरीबाबत कारवाईनंतरही तिचे मालक कोण हे स्पष्ट केले जात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

राज ठाकरे यांनी राजकारणाचे विद्रुपीकरण झाल्याचे म्हटले असून, हे कराचीतील माफियांच्या कार्यपद्धतीसारखे झाले आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नागपूरसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील लहान शहरांमध्येही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. सध्याचे राजकारणी केवळ सत्तेसाठी (सत्तांध) आसुसलेले असून, नागरिक मेले किंवा मुले ड्रग्सच्या आहारी गेली तरी त्यांना फरक पडत नाही, अशी टीका त्यांनी केली. लोकांनी मतदानातून आपला राग व्यक्त न केल्यास तक्रार कोणाकडे करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Published on: Jan 08, 2026 10:14 AM