राजापूर तालुक्यातील अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला आहे. धोधो कोसळणाऱ्या कालवा तुडूंब भरला आणि तो खुटून वाहू लागला. मुख्य बाब म्हणजे सहाच महिन्यापूर्वी या कालव्याचं काम करण्यात आलं होतं. दरम्यान, याबाबत प्रशासनानं तातडीनं लक्ष घालण्याची मागणी सध्या नागरिकांमधून होत आहे. पावसाचा जोर वाढल्यास इथले नागरिक आणि गुरं, जनावरांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे.