रायगडमधील तळीये गावात दरड कोसळल्याची घटना घडली असताना, तसाच प्रकार साताऱ्यातील पाटण तालुक्यात घडला. आंबेघर या गावात दरड कोसळून जवळपास 15 लोक ढिगाऱ्याखाली दबले. 23 जुलैला दुपारी हा प्रकार समोर आला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येत तआहे. आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. साताऱ्याच्या आंबेघरमध्ये 35 तासानंतरही मदत मिळालेली नाही. अनेक लोकं आ मदतीविना आहेत. घटनेला 35 तास उलटूनही त्यांच्यापर्यंत मदत मिळाली नाहीय. स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.