आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे. “निवडक लोक तुपाशी आणि बहुसंख्य जनता उपाशी, असे भेसूर चित्र 74 व्या प्रजासत्ताक दिनी दिसत असले तरी भविष्यात बदल घडवावाच लागेल . मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावे यासाठी देशातील प्रजेलाच आता एकजूट दाखवावी लागेल . घटनाकारांना अपेक्षित असलेला प्रजासत्ताक दिन ‘ चिरायू ‘ ठेवायचा असेल तर मूठभरांची सत्ता जावो आणि प्रजेची सत्ता येवो , हे विद्यमान राज्यकर्त्यांना ठणकावून सांगावेच लागेल!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.