शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस काळा दिवस आहे, शेतकऱ्यांना जे या कायद्याने स्वातंत्र्य मिळणार होते ते हिरावून घेतले. मूठभर दलाल आडती हे आज जिंकले, पण दलालच्या तावडीतून सुटू इच्छिणारा शेतकरी मात्र हारला , त्याचा पराभव झाला आहे. पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश शेतकरी मार्केट कमिटी भोवती बाजारपेठ फिरत असते, त्यांच्या टक्केवारी मिळते. कोट्यावधी रुपयांचा यात भ्रष्टाचार होत आहे त्यांना आता संधी मिळाली असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया शेतकरी नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.