महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी बंदला हिंसक वळणही लागलं आहे. महाराष्ट्र बंदमध्ये तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना शंभुराज देसाईंनी समज दिली आहे. औरंगाबादमधील व्यापारी संघटनांनी या आंदोलनात सहभागी न होण्याचे आधीच जाहीर केले होते. आज सकाळीच औरंगाबादमधील कृषी उत्पन्न बाजारसमितीतील दुकाने सुरु करण्यात आली. बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहक आणि खरेदी-विक्रेत्यांची गर्दी दिसून आली. 11 ऑक्टोबर रोजी सकाळीच नेहमीप्रमाणे बाजार समितीत ग्राहक तसेच खरेदी-विक्रेत्यांची मोठी गर्दी दिसून आली. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी रोजच्या प्रमाणेच दुकाने उघडून आपापले व्यवहार सुरू केले.