राणा दाम्पत्यावरील कारवाईवरून रावसाहेब दानवेंनी सरकारवर टीका केली आहे. राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं दानवेंनी म्हटलंय. शरद पवार यांनी स्वत: राजद्रोहाचा कायदा रद्द करण्यास सांगितलं होतं, असं दानवे म्हणाले. राणा दाम्पत्याने हनुमान चालीसाच्या पठणाची परवानगी मागितली होती. त्यावर राजद्रोह कसा, असा सवालही त्यांनी केली.