पवार Vs फडणवीस! बिहारच्या निकालावरून आरोप प्रत्त्यारोपांच्या फैरी

पवार Vs फडणवीस! बिहारच्या निकालावरून आरोप प्रत्त्यारोपांच्या फैरी

| Updated on: Nov 16, 2025 | 10:50 AM

बिहार विधानसभा निकालावर शरद पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणुकीपूर्वी महिलांना दिलेले 10 हजार रुपये योग्य होते का, असा सवाल त्यांनी केला. सरकारी तिजोरीतून पैसे वापरणे म्हणजे निवडणुका गैरमार्गाने लढवण्यासारखे आहे, असे पवार म्हणाले. यावर मुख्यमंत्री फडणवीस, दरेकर आणि बच्चू कडू यांनी विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला देत प्रत्युत्तर दिले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणुकीपूर्वी महिलांना सरकारी तिजोरीतून प्रत्येकी 10 हजार रुपये वाटण्यात आल्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवला. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सरकारी निधीचा अशा प्रकारे वापर करणे हे गैरमार्गाने निवडणूक लढवण्यासारखे आहे का, असा सवाल पवारांनी केला.

यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले. जो जिता वही सिकंदर, पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला. एनडीएचा विजय जनतेला योजना आवडल्यामुळे झाल्याचे फडणवीस म्हणाले. तर काँग्रेस नेते चेन्नीथल्ला यांनी हा भाजपचा नव्हे, तर निवडणूक आयोगाचा विजय असल्याची टीका केली आहे. या विविध प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर बिहार निवडणूक निकालांवरील राजकीय चर्चा तीव्र झाली आहे.

Published on: Nov 16, 2025 10:50 AM