गद्दार लोकं वंदनीय बाळासाहेबांचं नाव कसं घेणार

| Updated on: Aug 09, 2022 | 8:38 PM

सरकार असंविधानिक असून नैतिकतेने स्थापन झाले नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आज शपथविधी घेतना काही मंत्र्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले गेले नाही त्यावर प्रियंका चुतुर्वेदी म्हणाल्या की, ज्यांनी कोणी शपथ घेतली आहे, ते गद्दार असल्यानेच त्यांनी नाव घेतली नाहीत अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली. 

Follow us on

शिंदे-फडणवीस सरकारचा आज शपथविधी झाला मात्र ज्या दोन मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी शपथ घेतली त्या संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्याविषयी मात्र विरोधकांसह राजकीय नेत्यांमध्ये नाराजगी दिसून येत आहे. मविआचे सरकार असताना संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात आला होता. मात्र आज ज्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला त्याच मंत्र्यांना पहिल्या टप्प्यात त्यांना मंत्रिपद देण्यात आल्याची टीका शिवसेनेचे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. हे सरकार असंविधानिक असून नैतिकतेने स्थापन झाले नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आज शपथविधी घेतना काही मंत्र्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले गेले नाही त्यावर प्रियंका चुतुर्वेदी म्हणाल्या की, ज्यांनी कोणी शपथ घेतली आहे, ते गद्दार असल्यानेच त्यांनी नाव घेतली नाहीत अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.