मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधानांच्या भेटीला विरोधी पक्षाला नेलं असतं तर आनंद झाला असता, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.