चिखलफेक करणारे, चिखलात लोळणाऱ्यांना जनता जाणून आहे, राऊतांचा विरोधकांवर पलटवार

| Updated on: Nov 11, 2021 | 11:26 AM

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत गेले महिनाभर सुरु असलेल्या आर्यन खान प्रकरण, एनसीबी आणि आरोप प्रत्यारोपांवरुन सुरु असलेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या कवितेच्या ओळी ट्विट करत भाष्य केलं आहे.

Follow us on

नवी दिल्ली: शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत गेले महिनाभर सुरु असलेल्या आर्यन खान प्रकरण, एनसीबी आणि आरोप प्रत्यारोपांवरुन सुरु असलेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या कवितेच्या ओळी ट्विट करत भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी रामदास फुटाणे यांच्या चिखल या कवितेतील ओळी शेअर करत नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांना काव्यातून सूचक इशारा दिलाय.