प्रदीप कापसे, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. “जो प्रकल्प कधी आलाच नव्हता. कोणताही करार झाला नव्हता. तर मग प्रकल्प गुजरातला गेलाच कसा?”, असा सवाल श्रीरंग बारणेंनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे. वेदांता प्रकल्प गेल्याचा निषेध करण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आंदोलन केलं. त्याबाबत विचारलं असता बारणेंनी हे उत्तर दिलंय.