महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत मोठा भूंकप झाला. एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलं. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल 40 खासदार गेले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर राज्यात अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालं. मात्र, हे सरकार कायद्याच्या चौकटीत टिकणार नसल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून, तसंच विरोधकांकडून करण्यात येतोय. एकनाथ शिंदे यांना सरकार टिकवायचं असेल तर दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं जात आहे. 2016 मध्ये अरुणाचल प्रदेशातही असंच राजकारण पाहायला मिळालं होतं. तिथे नेमकं काय घडलं होतं, हे या स्पेशल रिपोर्टमधून समजून घेवूया