मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी लोकांना विलीकरणाचे फायदे समजावून सांगत आहेत, बुलडाण्यात एसटी कर्मचाऱ्यांनी तशी पत्रके लावले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून अनिल परब आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याच चांगलीच जुंपली आहे. अनिल परब यांनी मेस्मा लावण्याचा इशारा दिला आहे तर त्याला गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानी अनिल परबांच्या कायद्याच्या अभ्यासावरही काही सवाल उपस्थित केले आहेत. तर सरकार एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण तयार करत असल्याचा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद वाढताना पहायला मिळत आहे.