Ratnagiri | रत्नागिरीत ST कर्मचाऱ्यांचा संप, सकाळपासून 107 बसफेऱ्या रद्द
रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा फटका रत्नागिरी शहर बस वाहतुकीला बसला आहे. सकाळपासून तब्बल 107 शहर वाहतुकीच्या बसफेऱ्या रद्द झाल्यात. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होताना पहायल मिळतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा फटका रत्नागिरी शहर बस वाहतुकीला बसला आहे. सकाळपासून तब्बल 107 शहर वाहतुकीच्या बसफेऱ्या रद्द झाल्यात. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होताना पहायल मिळतात. रत्नागिरी शहर बसस्थानकातून गेले दोन तास एकही एसटी सुटलेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. खास करून विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. वेळत बस आली नाही त्यामुळे आयटीआय चे काही विद्यार्थी शहर बस स्थानकात अडकून पडलेत. बस वेळेवर सुटली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचता आले नाही त्यामुळे अनेक मुलांचे प्रॅक्टिकलची परीक्षा चुकली आहे.
Follow Us
