शिवभोजन थाळी उपक्रम शिंदे सरकारकडून बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यादरम्यान त्यांच्याच गटातील काही आमदारांकडून या निर्णयाला विरोध केला जात आहे. तर शिवभोजनवरून शिंदे गटातील मतभेद समोर येत आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने पहिल्याच दिवशी कोल्हापुरच्या श्री अंबाबाईची सिंहासनारूढ पूजा बांधण्यात आली. तसेच पुण्याहून लवकरच आता वंदे भारत रेल्वे धावण्याची शक्यता आहे. तर नाशिककरांना आता तिन दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे. नाशिकमध्ये पाणीपुरवठा आज संध्याकाळपासून बंद होणार आहे. तसेच राज्याची राजधानी मुंबईत विनयभंगाच्या तक्रारीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील ग्रामपंचायतीची निवडणूका या 13 ऐवजी 16 ऑक्टोंबरला होणार