आर्यन खानला अटक केल्यानंतर मी या प्रकरणाची पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एनसीबीचे धाबे दणाणले. त्यानंतर अभिनेता शाहरुख खानलाही घाबरवण्याचे प्रयत्न झाले. नवाब मलिक बोलना बंद नही करेगा तो तेरा बेटा लंबा जायेगा, अशा शब्दात शाहरुखला घाबरवलं गेलं, असा दावा मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आर्यन प्रकरणी एनसीबीची पोलखोल केली. आर्यन खानला अटक केल्यानंतर मी एनसीबीची पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एनसीबीकडून शाहरुख खानला घाबरवण्याचं काम केलं गेलं. नवाब मलिकने बोलायचं थांबवलं नाही तर तुझा मुलगा दीर्घकाळासाठी आत जाईल, अशा शब्दात शाहरुखला घाबरवलं गेलं होतं, असा दावा मलिक यांनी केला.