Terrorist Attack in Rajouri: स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर दहशदवाद्यांचा मोठा कट उधळण्यात लष्करांना यश आलेले आहे. राजौरीच्या लष्करी कॅम्पवर सकाळी दहशदवाद्यांनी हल्ला केला त्यानंतर दहशवादी आणि लष्करांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात लष्करांना यश आले आहे. सध्या या ठिकाणी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे परगल येथील लष्करी छावणीत किती दहशतवादी घुसण्याचा प्रयत्न करत होते याबाबत ठोस माहिती समोर येणे बाकी आहे. मात्र लष्कराच्या सतर्कतेने मोठा घातपात टळला आहे.