पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi ) उद्घाटन केलेल्या नदीसुधार योजनेला राज्य सरकारने (State Government) ब्रेक लावला आहे. 7 हजार कोटीचा प्रकल्प आता रेंगाळणार आहे. पुररेषेत झालेला बदल आणि पर्यावरण वाद्यांचे आक्षेप पाहता हा निर्णय घेण्यात आलाय. शनिवारी मुंबईत खासदार शरद पवार, वंदना चव्हाण ,जयंत पाटील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , पर्यावरण विभागाच्या सचिव महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज्य सरकारने बुधवारी तातडीची बैठक बोलावली आहे..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे..