गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळतीय. आजही मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पावसामुळे अनेक भागांत पाणी साचतंय. नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. तर रेल्वेसेवेवर देखील पावसाचा परिणाम होतोय. आज सकाळपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे, वाहतूक सेवेवर आणि मुंबई लोकलवर त्याचा कसा परिणाम झाला आहे. त्यामध्ये अंबरनाथमध्ये वालधुनी नदीने घेतलं रौद्ररुप घेतले आहे. शिवमंदिरात जाणारे पूल पाण्याखाली गेला आहे.