चंद्रपूर जिल्हातील (Chandrapur) अनेक भागांमध्ये वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. भटाळी गावामध्ये तर एक खतरनाक घटना घडली आहे. भटाळी गावामध्ये वाघ (Tiger) आणि गावकरी एकमेकांसमोर आले. त्याचे झाले असे की, इरई नदी शेजारी वाघाने एका गाईची शिकार केली. याची कुणकुण गावामध्ये लागली आणि गावकरी घटनास्थळी आले आणि त्या वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते.