VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 3 October 2021

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 3 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 12:25 PM

बेळगावात 15 टक्के मराठी भाषिक असल्याचा कर्नाटकच्या जनगणनेत अजब निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकारचा हा संपूर्ण रिपोर्ट खोटा आहे. त्यावर महाराष्ट्र सरकार भूमिका का घेत नाही? राज्य सरकार गप्प का?, असा संतप्त सवालच संजय राऊत यांनी केला आहे.

बेळगावात 15 टक्के मराठी भाषिक असल्याचा कर्नाटकच्या जनगणनेत अजब निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकारचा हा संपूर्ण रिपोर्ट खोटा आहे. त्यावर महाराष्ट्र सरकार भूमिका का घेत नाही? राज्य सरकार गप्प का?, असा संतप्त सवालच संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी थेट ठाकरे सरकारलाच घरचा आहेर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा संताप व्यक्त केला. बेळगावात मराठी माणूस अल्पसंख्याक आहे. बेळगावात 15 टक्के मराठी माणसं आहेत असं कर्नाटक सरकार म्हणत असले तरी ते अत्यंत धादांत खोटं आहे, असंही राऊत म्हणाले.