Latur News | लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आलेलं पिक उद्ध्वस्त

Latur News | लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आलेलं पिक उद्ध्वस्त

| Updated on: Apr 05, 2026 | 2:35 PM

लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकर्‍यांना मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा दहा दिवसांमध्येच तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं पिकं उद्ध्वस्त झाले.

लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकर्‍यांना मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा दहा दिवसांमध्येच तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं पिकं उद्ध्वस्त झाले.

महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. लातूरमधील शेत मालकाने सांगितले की, 9 लाख रुपये खर्च करुन 10 एकर जमीनीवर कांदा पिक लावलं होतं मात्र सलग तीन दिवस झालेल्या पाऊस आणि गारपिठीमुळे सगळंच्यासगळं पिक उद्ध्वस्त झालं. शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना यंदा 30 टन इतकं उत्पादन होण्याची अपेक्षा होती मात्र अवकाळीमुळे 30 किलो पीकदेखील उरलेलं नाही. बळीराजकडे आता नष्ट झालेलं पिक कापणीचेही पैसे नाहीत. शेतकऱ्यांवर अगदी कर्जबाजारी होण्याची पाळी आली आहे.
दरम्यान, झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Published on: Apr 02, 2026 02:40 PM
Follow Us